वाहनाच्या प्रकाशावर अंत्यसंस्कार
घणसोली स्मशानभूमीत अंधार, महापालिकेचे दुर्लक्ष
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी अर्थसंकल्पात सहा हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे; पण घणसोली सेक्टर १६ मधील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंधार पसरत असल्याने वाहनाच्या प्रकाशावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घणसोली स्मशानभूमीत अत्यावश्यक असलेल्या प्रकाशयोजनेचा अभाव आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अंत्यविधी पार पडताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा संध्याकाळी किंवा रात्री उशिरा अंत्यविधी सुरू होतात. जेव्हा परिसरात अंधार असतो. परिणामी, उपस्थितांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच बत्ती गुल झाल्यामुळे मृताच्या नातेवाइकांना मोबाईलच्या फ्लॅशलाइट किंवा वाहनांच्या प्रकाशावर अंतिम विधी करावे लागत आहेत. या प्रकाराबाबत स्थानिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; पण त्याची दखल घेतली जात नसल्याने पालिकेविरोधात नाराजीचा सूर आहे.
------------------------
एका बाजूला कोट्यवधींच्या निधीचा चुराडा केला जातो; मात्र दुसरीकडे नागरी सुविधांवर खर्च करण्यात पालिका आखडता हात घेत आहे.
- संदीप गलगुडे, शहर संघटक, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.