पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कल्याण, ता.२९ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून कल्याण पूर्व आणि श्री मलंगगड परिसरातील ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेती क्षेत्रांत पाणी साचल्याने उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने मदत द्यावी, अन्यथा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.
महेश गायकवाड यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, प्रशासनाने पुढाकार घेऊन मदत देण्याचे आवाहनही त्यांनी केले. गायकवाड यांनी तहसीलदार, तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्राची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
...तर अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही
अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत जबाबदारी पार पाडली नाही, तर ते कार्यालयात येतील पण घरी परत जाऊ देणार नाही, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. गायकवाड यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांना दिलासा दिला असून संयम राखण्याचे आवाहन केले. आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.