अवकाळी पावसामुळे भाजी बाजारात आवक कमी
जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी आणि जोरदार पावसाने शेतकऱ्यांबरोबरच भाजीपाला बाजारालाही मोठा फटका बसला आहे. पावसामुळे अनेक भागांतील शेती पाण्याखाली गेल्याने भाजीपाला बाजारात लक्षणीय आवक घटली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात पुरवठा कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतमाल काढणीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने भाजीपाला शेतातच खराब होत आहे. शिवाय पावसामुळे शेतात मजूर काम करण्यास तयार होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही मजूर उपलब्ध असले तरी मजुरी खर्च वाढल्याने भाजीपाल्यालाा योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी बाजारात माल पाठविणे टाळत आहेत. परिणामी घाऊक बाजारात अनेक ठिकाणी रिकामी टोपली दिसून येत आहे. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असले तरी काही भाज्यांच्या दरात फारसा फरक दिसून आलेला नाही. शिमला मिरचीची आवक तुलनेने चांगली राहिली असून, ती घाऊक बाजारात २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तर काटेरी वांगी आणि काळी वांगी या प्रकारांना बाजारात चांगला उठाव दिसून आला. या वांग्यांचे दर २५ ते ३० रुपये प्रतिकिलो इतके राहिले.
........
चौकट
भाजीपाल्याची एकूण आवक घटल्याने किरकोळ बाजारात किंचित तुटवडा जाणवत असला तरी दर अजून वाढलेले नाहीत. मात्र व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, की जर पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिला, तर येत्या आठवड्यात भाजीपाला दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे, परंतु ग्राहकांनाही त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.