मुंबई

खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानाने बुजवले

CD

हेदवली पुलावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले
मुरबाड, ता. ६ (बातमीदार) ः तालुक्यातील हेदवली व कातकरी वाडीतील ग्रामस्थांना टोकावडे गावात येण्यासाठी कनकवीरा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो व ग्रामस्थांचा संपर्क तुटतो. हेदवली परिसरातील शेतकऱ्यांना खरेदी-विक्रीसाठी आणि विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी टोकावडे येथे जावे लागते. पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्याने पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते; मात्र हे खड्डे बुजवण्याचे काम करण्याची तत्परता संबंधित शासकीय विभाग दाखवत नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी खडी व मुरूम टाकून श्रमदानातून या पुलावरील खड्डे बुजवले आहेत.

फोटो ओळी
मुरबाड ः तालुक्यातील हेदवली येथील नदीच्या पुलावर पडलेले खड्डे ग्रामस्थांनी बुजवले.

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Earn Lakhs Without Job : नोकरी न करताही तुम्ही मिळवू शकता लाखोंचं पॅकेज!, फक्त पास करा एक परीक्षा

Suryakumar Yadav: 'मी अन् गौती भाई एकाच पानावर...', ऑस्ट्रेलियाला चौथ्या T20I मध्ये पराभूत केल्यानंतर नेमकं काय म्हणाला सूर्या?

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

Latest Marathi Live Update News : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढली

SCROLL FOR NEXT