पालघर, ता. १० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार काळात नागरिक आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून शांतता आणि कायद्याचे भान राखा, असे आवाहन पालघर पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद टोकाचे न होता, लोकशाही मूल्यांचा आदर व्हावा, यासाठी हे विशेष आवाहन जारी करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पालघर जिल्ह्यात डहाणू, पालघर, जव्हार नगर परिषद आणि वाडा नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षाच्या समर्थकांशी वाद घालणे, धमक्या देणे, चिथावणीखोर किंवा भडकाऊ वक्तव्ये करणे किंवा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करणे कठोरपणे टाळावे. समाजमाध्यमांवर चुकीचे, आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, मेसेज किंवा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यास ते सायबर गुन्हा मानले जाईल आणि सायबर कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
मदत केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन
प्रचारसभा, मिरवणुका किंवा इतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. लहानसहान वाद किंवा तणावाच्या परिस्थिती तत्काळ पोलिस मदत क्रमांक ११२ वर किंवा संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कळवावी. निवडणुकीच्या काळात कोणत्याही वादानंतर गंभीर गुन्ह्याचे रूप घेऊ शकतो. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.