नारळाच्या कचऱ्यापासून मुक्ती
महापालिकेकडून काथ्या, कोकोपीटची निर्मिती
वाशी, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून तुर्भे क्षेपणभूमीवर शहरातील नारळपाणी विक्रेत्यांकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून काथ्या, कोकोपीटची निर्मिती केली जात आहे.
नवी मुंबई क्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात नारळपाणी विक्री होते. त्यातून निर्माण होणारा रिकामा नारळ पूर्वी कचरा म्हणून टाकला जात होता. मात्र पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून पालिकेने हा कचरा थेट संसाधनात परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विशेष संकलन व्यवस्था उभी करण्यात आली आहे. नारळपाणी विक्रेत्यांकडून नारळांच्या कचरा संकलनासाठी नवी मुंबई महापालिकेने दोन परिमंडळांमध्ये प्रत्येकी दोन अशी एकूण चार वाहने नियुक्त केली आहेत. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच विक्रेत्यांकडून दररोज ४० ते ५० टन नारळ गोळा करतात. हा कचरा तुर्भे येथील क्षेमणभूमी येथील प्रक्रिया केंद्रात पाठवला जातो. त्यानंतर यंत्रणेद्वारे नारळाच्या करवंटीचे वर्गीकरण होते. जाड कवचांपासून दोरखंडासाठीच्या काथ्याची निर्मिती केली जाते. तर दुसरीकडे नारळातील सूक्ष्म घटकांपासून तयार होणारे कोकोपीट नवी मुंबई पालिकेच्या उद्यानांमध्ये वापरले जात आहे.
---------------------
उत्पादनांच्या विक्रीची योजना
महापालिकेच्या या प्रकल्पांना चांगला प्रतिसाद आहे. यामुळे भविष्यात संकलन क्षमता वाढवून उत्पादनांच्या व्यापारीकरणाची योजना पालिकेची आहे. कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी पालिकेचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.