मुंबई

प्राणवायू देणाऱ्या झाडांचा श्वास कोंडला!

CD

वसई, ता. २० (बातमीदार) ः शहरात वृक्षारोपणासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. तसेच त्यांचे जतन, संवर्धनाचा नारा दिला जातो. याचबरोबर प्रत्येकाने किमान एक रोपटे लावा, असे आवाहन केले जाते; मात्र वृक्षारोपण केल्यावर वसई-विरार महापालिका कितपत त्यांचे जतन करण्यास लक्ष घालते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘नागरिकांना प्राणवायू देण्यापूर्वी आमचा श्वास गुदमरत आहे. आम्हाला जगवा’, असा जणू टाहो काही रोपटी फोडत आहेत, असे एकंदरीत चित्र वसईत दिसू लागले आहे.

वसई-विरार महापालिका परिसरात हिरवळ निर्माण व्हावी, म्हणून मोकळ्या जागेसह सार्वजनिक ठिकाणी, तसेच वनविभाग व अन्य जागेत वृक्षलागवडीचा उपक्रम राबवते; परंतु अनेक भागांत रोपट्यांची निगा राखली जात नसल्याचे समोर येत आहे. वसई पश्चिमेकडील सनसिटी, चुळणे भागात महापालिकेने मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड केली आहे. त्यांच्याभोवती जाळ्यादेखील लावल्या आहेत; परंतु या जाळ्यांमुळे झाडांची अवस्था बिकट आहे. आता रोपटी मोठी झाल्याने त्यांच्या वाढीमध्ये जाळ्या, रोपटी आडवी येत आहेत. त्यातच गवताने रोपांना विळखा घातला आहे. लागवडीनंतर त्याची देखभाल योग्य प्रकारे होत असल्याचे दिसून येत नाही.

वसईच्या या मार्गावरून प्रशासकीय अधिकारी ये-जा करतात; परंतु कोणाचेही लक्ष नाही का, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित होऊ लागला आहे. पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडल्यावर इवल्याश्या रोपट्यांकडे पाठ फिरवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लागवडीविना रोपे
बांबूची लागवड करावी, यासाठी पालघर जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. लाखोच्या संख्येने बांबू जंगलनिर्मिती केली जाणार आहे; मात्र वसई महापालिकेच्या बालभवन येथे लागवडीविना बांबूची रोपे पडून आहेत. त्यामुळे कृतीतून जनजागर दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित प्रभागाला सर्व्हेच्या सूचना
महापालिकेच्या क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ज्या ठिकाणी रोपांना लावलेले सुरक्षित पिंजरे नादुरुस्त अवस्थेत आहेत, गवत वाढले आहे, त्यांचे सर्व्हे संबंधित प्रभागाला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोपांची देखभाल पालिकेकडून करण्यात येत आहे, असे उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले.

वृक्षांच्या देखभालीचा प्रश्न चिंतेची बाब असल्याचे प्रशासकीय राजवटीत समोर येत आहे. सनसिटी भागात रोपांना सुरक्षित जाळ्या लावण्यात आल्या; मात्र मोठ्या प्रमाणात पडलेल्या अवस्थेत झाडे आहेत. त्यांना गवताने आच्छादले आहे. त्यामुळे वाढ होण्यास अडचण येत आहे.
- कल्पेश मानकर, माजी नगरसेवक

वसई पश्चिमेकडील डीजीनगर भागात बालभवन उद्यान आहे. याठिकाणी लागवडीसाठी ठेवलेली बांबूची रोपे पिशवीसहित पडून आहेत. त्यांची लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा रोपे सुकतील.
- सतीश अडसूळ, ज्येष्ठ नागरिक, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

Google Name Facts: गुगलच्या नावात आहेत तब्बल 10 “O”! जाणून घ्या यामागचा खरा अर्थ

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

SCROLL FOR NEXT