मुंबई

अंबरनाथ विषारी वायू प्रदूषण: ११ कंपन्यांवर कारवाईचा

CD

अंबरनाथमध्ये कंपन्यांवर कारवाईचा बडगा
प्रदूषणप्रकरणी १३ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची तंबी
अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) ः काही दिवसांपूर्वी शहरातील भीमनगर, एम.पी. गेट, निसर्ग ग्रीन, पाठारे पार्क, तसेच पश्चिम परिसरात विषारी वायूचे लोट पसरल्याने नागरिकांना श्वास घेणे मुश्कील झाले होते. या गंभीर घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १३ कंपन्या तत्काळ बंद करण्याचे आदेश कंपनी मालक आणि प्रशासनाला दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी निसर्ग ग्रीन, पाठारे पार्क, ग्रीन सिटी परिसरातील नागरिकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कारखानदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, नगरपालिका आणि अग्निशमन दल अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रदूषणाच्या मुद्द्यावर राज्य शासनाकडे दाद मागण्यात आली होती.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही कंपन्या सील करण्यात आल्या. तर अनेकांना कारणे दाखवा नोटीस दिल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जयंत कदम यांनी सांगितले, की याप्रकरणी मोरीवली एमआयडीसी आणि चिखलोली एमआयडीसी परिसरातील एकूण १३ कंपन्या तत्काळ बंद करण्याचे आदेश कंपनी मालक आणि प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मोरीवली एमआयडीसीतील सोलार केमिकल्स, नॅशनल केमिकल इंडस्ट्री, सीताराम केमिकल्स, निका केम प्रॉडक्ट्स, लक्ष्मी फाईन इंडस्ट्री, हलीदे केमिकल्स, श्रीअंबा मेटल अँड केमिकल्स, आशु ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. तसेच चिखलोली एमआयडीसी परिसरातील इंडोकेम लिमिटेड, सुमा फार्मासिटिकल, पारूल रूपेश पोद्दार, सुमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, फेगडे प्लास्टिकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात वारंवार रासायनिक कंपन्यांद्वारे विषारी वायूंचे प्रदूषण होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या तपासणीतही या कंपन्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अशाप्रकारे प्रदूषण होत असल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांवरसुद्धा अशीच कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.
गेल्या १० वर्षांपासून प्रदूषणविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी मोरीवली एमआयडीसी (अंबरनाथ पश्चिम) परिसरातून सर्वाधिक वायू प्रदूषण होत असल्याचा दावा केला. तसेच झालेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले. सातत्याने कारवाई झाल्यास प्रदूषणाची समस्या निर्माण होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

Google Name Facts: गुगलच्या नावात आहेत तब्बल 10 “O”! जाणून घ्या यामागचा खरा अर्थ

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

SCROLL FOR NEXT