चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करा
ठाकरे गटाचे पोलिसांना निवेदन
कल्याण, ता. २३ (बातमीदार) : अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरुन शहरात राजकीय वातावरण तापले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या मारहाणीमुळे अर्णवने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या प्रकरणात भाषावाद कारणीभूत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. मात्र, अद्याप पोलिस तपास पूर्ण न झाल्याने असे आरोप करणे म्हणजे शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे पक्षाने केला आहे. यासंदर्भात वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख नारायण पाटील यांनी चित्रा वाघ यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे राजकारण करणे निंदनीय आहे. कल्याण नगरीचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी भाजपावर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाषाभेदाचे राजकारण केल्याचा आरोपही केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाणे व गुन्हे शाखेकडे चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. शिष्टमंडळात विधानसभा प्रमुख नारायण पाटील, विभागप्रमुख किरण निचळ, उपशहरसंघटक शांताराम डिगे, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक बोयतकर, उपविभागप्रमुख जितेंद्र आणि प्रसाद भंडारी उपस्थित होते. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यामुळे कल्याण शहरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे किरण निचळ यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून सत्य परिस्थिती लवकरच स्पष्ट होणार असल्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.