मोबाईल बघू नकोस म्हटल्याने अल्पवयीनचे घरातून पलायन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : वडिलांनी केवळ अभ्यास कर आणि मोबाईल जास्त बघू नकोस असे बोलल्याचा राग मनात धरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातून पलायन केले आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट परिसरातील लसूण विक्रेत्याचा तो मुलगा असून तो नववीचा विद्यार्थी आहे. त्या मुलाला त्याचे वडील शुक्रवारी (ता. २१) मोबाईल जास्त बघू नकोस इतके बोलले. त्यानंतर, तो मुलगा कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. तो रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या पालकांनी नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली. पण, तो मिळून आला नाही. त्याला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.