दुबार मतदारांना केंद्र निवडीचा पर्याय रद्द करा;
माजी सभापती अजीव पाटील यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
विरार, ता. ५ (बातमीदार) : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार मतदान केंद्र निवडण्याची दिलेली मुभा घातक ठरू शकते, असा इशारा देत हा पर्याय तत्काळ रद्द करण्याची मागणी माजी सभापती अजीव पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात ८० हजारांहून अधिक दुबार मतदार असल्याची यादी पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केली होती. त्यानंतर आयोगाने दुबार मतदारांकडून ‘कोणत्या केंद्रावर मतदान करणार’ याचा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया लागू केली आहे. अर्ज भरल्यानंतर संबंधित मतदाराला त्याच केंद्रावरच मतदान करता येणार आहे, मात्र मतदान केंद्र निवडीचा पर्याय दिल्यास मतदार किंवा राजकीय पक्ष ठरवून प्रभाग बदलण्याची शक्यता वाढेल आणि निवडणूक प्रक्रियेचा उद्देश धोक्यात येईल, असा पाटील यांचा दावा आहे. मतदार ज्या प्रभागात वास्तव्यास आहे, त्याची कागदपत्रांच्या आधारे खातरजमा करून त्याच केंद्रावर मतदानाची परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली आहे.
या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका न घेतल्यास हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायिक पुनर्विलोकनासाठी जाण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.