धूळ नियंत्रणासाठी बांबू लागवड
मुंबई, ता. ८ : मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, सतत वाहतुकीची वर्दळ आदी प्रदूषण पसरवणाऱ्या घटकांवर नियंत्रणासाठी पालिका उपाययोजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मोकळ्या जागांवरील धूळ इतरत्र पसरू नये, यासाठी तेथे पाच वर्षासाठी बांबूंची नर्सरी तयार करण्याचा विचार पालिकेचा आहे. ज्या जागांवर पाच वर्ष कोणताही प्रकल्प राबवला जाणार नाही अशा जागांवर बांबू उभारून नर्सरी तयार केली जाईल, यासाठी अभ्यास करून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.
वायुप्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यातच मुंबईतील मोकळ्या जागांवर माती, धूळ जमा होते, ही धूळ इतरत्र पसरते. त्यामुळे येथील धूळ पसरू नये, यासाठी या ठिकाणी बांबूंची रोपवाटीकी तयार केली जाणार आहे. यासाठी ज्या जागांवर पाच वर्षांसाठी कोणताही प्रकल्प राबवला जाणार नाही. अशा जागा निवडल्या जाणार आहे, मात्र याची अंमलबजावणी करण्याआधी अभ्यास केला जाईल व त्यानंतरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.