मुंबई

मालवणीत कचरा जाळून विल्हेवाट; धुरामुळे प्रदूषणात वाढ

CD

मालवणीत कचरा जाळून विल्हेवाट; धुरामुळे प्रदूषणात वाढ
मालाड, ता. ११ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक सहा येथील नवीन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा काही स्थानिक नागरिकांकडून जाळला जात आहे. त्यामुळे परिसरातील वायुप्रदूषणात वाढ होत असल्‍याचे रहिवाशांचे म्‍हणणे आहे.
नवीन रस्त्यावरील कचरा नियमित उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी स्वतःच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे; मात्र या कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असल्याने तो जाळताना उठणारा धूर आरोग्यासाठी घातक ठरत आहे.
मुंबईमध्ये आधीच वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना अशा प्रकारे कचरा जाळल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांकडून अशा उपायांकडे वळण्याची वेळ येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
तज्ज्ञांच्या मते, प्लॅस्टिक जाळल्यामुळे हवेतील विषारी वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे श्वसनाचे त्रास, ॲलर्जी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात स्थानिक आणि पालिका यांच्यात समन्वयाची गरज तीव्रपणे जाणवते.
कचरा नियमित उचलणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT