मुंबई

पालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात

CD

पालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात
पहिल्या दिवशी अर्जांचा ‘शून्य’ आकडा; पडद्यामागे हालचाली
वाशी, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असली, तरी पहिल्याच दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल न झाल्याचे चित्र आहे. पालिका निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा सुरू असूनही राजकीय हालचाली सध्या पूर्णतः पडद्यामागेच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारांना येत्या ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार आहेत. त्यानंतर ठरलेल्या तारखेला अर्जांची छाननी होईल. वैध अर्जांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार असून, या सर्व प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, पहिल्या दिवशी अर्ज न भरल्याने निवडणुकीच्या सुरुवातीलाच एक वेगळाच संदेश गेला आहे. राजकीय जाणकारांच्या मते, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न होण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमधील अंतर्गत चर्चा, जागावाटपाबाबत सुरू असलेली अनिश्चितता तसेच उमेदवारांच्या नावांवर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब न झाल्यामुळे इच्छुकांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीसाठी बैठका, गुप्त चर्चा आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे बहुतेक उमेदवार शेवटच्या टप्प्यात अर्ज भरण्याचा कल दाखवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी काही दिवसांत राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर महापालिका मुख्यालय तसेच संबंधित प्रभाग कार्यालयांमध्ये नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खरी गती पुढील काही दिवसांत येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
.................
योग्य उमेदवार निवडण्यावर भर
विशेष म्हणजे, नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून, आगामी विधानसभा व लोकसभा राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पक्ष अधिकाधिक गणिते तपासून, योग्य उमेदवार निवडण्यावर भर देत आहे. यामुळेच इच्छुक उमेदवार असूनही पहिल्या काही दिवसांत अर्ज न भरण्याची रणनीती स्वीकारली जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने नामनिर्देशन प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकारी आणि आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकृतीदरम्यान कोणताही गोंधळ अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

Dhaka bomb blast : भीषण बॉम्बस्फोटाने बांगलादेशचं ढाका हादरलं!; भर बाजारपेठेत अज्ञाताने फेकला 'क्रूड बॉम्ब'

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

SCROLL FOR NEXT