श्रमदानातून खडकोना येथे ''वनराई बंधारा''
पालघर, ता. २८ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद पालघरच्या पुढाकारातून वाडा-खडकोना येथे सामूहिक श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली. या उपक्रमात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, शिक्षक, विद्यार्थी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान केले. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवले जाऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन जमिनीची धूप थांबण्यास मदत होणार आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून गावपातळीवर विकासाभिमुख कामे करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. भविष्यातही अशाच प्रकारे लोकसहभागातून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबवली जातील, असा विश्वास मनोज रानडे यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.