धावत्या कारला आग; पाच जण बचावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः देवळाली येथून मुंबईत निघालेल्या प्रवासी कारने ठाण्यात पेट घेतल्याची घटना रविवारी (ता. २८) रात्री घडली. कारमधून धूर येत असल्याचे पाहून चालकासह पाच जण स्वतःहून बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. यामध्ये चार महिलांचा समावेश असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
रॅपिड कारचालक यश शहा हा देवळाली येथून प्रवासी घेऊन मुंबईला निघाला होता. कार ठाण्यातील तीन हात नाका येथील गुरुद्वाराजवळून रविवारी रात्री जात असताना कारच्या बोनेटमध्ये आग लागली. याची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत त्या आगीवर दहा मिनिटांत नियंत्रण मिळवले. कारमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर कारमधून प्रवास करणाऱ्या चालकासह चार महिला सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःहून बाहेर पडल्याने बचावल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.