मुंबई

तीळाच्या पिकावर अस्मानी संकट

CD

तिळाच्या पिकावर अस्मानी संकट
पालघरमधील शेतकरी चिंताग्रस्त; मॉन्सून लांबणीचा फटका

मनोर, ता. १ (बातमीदार) : मॉन्सून लांबल्याचा फटका पालघर जिल्ह्यातील काळ्या तीळ पिकाला बसला आहे. नोव्हेंबरचे वातावरण डिसेंबरमध्ये मिळाले नसल्याने महिनाभर उशिराने रब्बी हंगामासाठी केलेली तीळ पिकाची पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नांगरणी, पेरणी आणि बियाणे खर्च वाया गेला आहे. तसेच तिळाच्या तेलविक्रीतून मिळणारे उत्पन्न बुडणार असून घरात लागणारे खाद्य तेलही खरेदी करावे लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. खरीप हंगामात भातपिकाचे मोठे नुकसान झाले होते. आता रब्बी हंगाम वाया गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.

यंदाच्या रब्बी हंगामाला उशिराने सुरुवात झाली होती. उशिरा झालेल्या पेरणीमुळे अपेक्षित वातावरण मिळाले नसल्याने तिळाची पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे तीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तिळाची लागवड करणारे शेतकरी नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात असताना मॉन्सून लांबल्याने पेरणी केलेल्या पिकाला वाफ मिळाली नसल्याने तिळाची रोपे उगवली नाहीत.
दरवर्षी रब्बी हंगामात पालघर जिल्ह्यातील ६४४ हेक्टर क्षेत्रावर औषधी गुणधर्म असलेल्या काळ्या तिळाची लागवड केली जाते. संपूर्ण राज्यात काळ्या तिळाचे उत्पादन पालघर जिल्ह्यात घेतले जात असून सर्वाधिक लागवड पालघर तालुक्यात केली जाते. सूर्या आणि वैतरणा नदीकाठच्या चिकण मातीत मोठ्या प्रमाणात काळ्या तिळाची लागवड केली जाते. जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, तूर, भुईमूग, कुळीथ आदी पिके घेतली जातात; परंतु कमी कष्टाचे आणि खाद्य तेल देणारे पीक असल्यामुळे काळ्या तिळाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
तीळ लागवडीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. पालघर तालुक्यातील सूर्या आणि वैतरणा नदीकिनारच्या बहाडोली, दहिसर, कुडे, चहाडे, सागावे, गिरनोली, लालठाणे, तांदूळवाडी, पारगावसह इतर काही गावांमध्ये तिळाची लागवड केली जाते. सुरुवातीला १०० ते १२५ हेक्टर असलेले पालघर तालुक्यातील तीळ लागवडीचे क्षेत्र ३८५ हेक्टरहून अधिक क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. रब्बी हंगामात उत्पादित काळ्या तिळापासून घरगुती वापरासाठी खाद्यतेल मिळते; मात्र व्यावसायिक दृष्टिकोन नसल्याने तीळ लागवड क्षेत्रात वाढ होत नाही.

पालघर तालुक्यातील रब्बी लागवड क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कार्यक्रमांतर्गत पालघर तालुक्यासह जिल्ह्यात तिळाची लागवड वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मॉन्सून संपल्यानंतर तीळ लागवडीसाठी पेरणी केलेल्या बियाण्यातून रोपे उगवली नाहीत. त्यामुळे पेरणीचा खर्च वाया गेला असून घरात लागणारे खाद्यतेल बाजारातून खरेदी करावे लागणार आहे. तीळ लागवड खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली पाहिजे.
- शादीक शेख, शेतकरी, दहिसर

तीळ लागवडीच्या भागाची पाहणी

पेरणी वाया गेल्याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. लवकरच तीळलागवड होत असलेल्या भागाची पाहणी करण्याचे निर्देश कृषी सहाय्यकांना दिले जातील, असे तालुका कृषी अधिकारी सतीश बागुल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT