‘त्या’ उमेदवारांवर कारवाई करा
शिवसेना ठाकरे गटाची आयुक्तांकडे मागणी
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत २० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत; मात्र निवडणूक कार्यालयाने विजयी उमदेवार जाहीर केले नाहीत. राजकीय पक्षांनी तशी यादी जाहीर करीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) उपनेते विजय साळवी यांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काही पॅनेलमधील प्रभागात आर्थिक दबावाला, सरकारी राजकीय दबावाला घाबरून काहींनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. अनेक उमेदवारांना त्याच प्रकारचे दबावतंत्र वापरण्यात आले; परंतु त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. पॅनेल पद्धतीने निवडणूक असल्यामुळे पॅनेलला मतदान होणार आहे. ज्या प्रभागात उमेदवारांना प्रतिस्पर्धा नसल्यामुळे त्यांनी आपण विजयी झालो, हे जाहीर केले. त्या उमेदवारांच्या पक्षाने आपल्या लेटरहेडवर तसे जाहीर केले; मात्र निवडणूक कार्यालयातून हे विजयी झाले आहेत, असे जाहीर झालेले नाही. त्यांना निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. निवडणूक कार्यालयाने त्यांना विजयी झाल्याचे पत्र किंवा प्रमाणपत्र दिलेले नसताना त्यांनी स्वतः व त्यांच्या पक्षाने विजयी म्हणून जाहीर करणे हे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप साळवी यांनी केला आहे. तसेच त्यांची उमेदवारी त्वरित रद्द करण्याची मागणी साळवी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.