शासकीय भूखंड वादामुळे तणाव
आरटीआय कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी
पेण, ता. १३ (वार्ताहर) : पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरातील सर्व्हे नंबर ४९५ या शासकीय भूखंडावरून आदिवासी समाजाचे विश्वास कानू वाघ व माहिती अधिकार कार्यकर्ते अमोद मुंडे, नागेश सुर्वे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. सदर जागेतील दोन गुंठ्यावर वाघ यांनी घर बांधले असून, उर्वरित सुमारे १२ गुंठे जागा ही शासनाच्या ताब्यात असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा दावा आहे.
विश्वास वाघ यांनी आरटीआय कार्यकर्त्यांच्या विरोधात गुरुवारी (ता. ८) आदिवासी समाजाचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले. तर मुंडे-सुर्वे यांनीही सोमवारी (ता. १२) पत्रकार परिषद घेऊन जागा हडप केल्याचा आरोप करत शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली.
जमिनीच्या उर्वरित भागासाठी आम्ही शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत, परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी वारंवार अर्ज करून माझे घर तोडण्याची मागणी केली व नऊ वर्षे नाहक त्रास दिला. त्यामुळे कारवाईची मागणी केली आहे, असे विश्वास वाघ म्हणाले.
सदर प्रकरण शासन स्तरावर असून, वरिष्ठांकडून अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले. तत्पूर्वी या वादाचा निष्कर्ष लागू शकत नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढलेला असून, शासनाच्या अहवालाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
कोट
‘पेण हद्दीतील शासकीय जागा व्यक्तिगत ताब्यात जाऊ नये, म्हणून आम्ही २०१७ पासून प्रयत्न करतो आहोत. उर्वरित १२ गुंठे जागा आदिवासी भवन, यूपीएससी-एमपीएससी विद्यार्थी व बेघर आदिवासींसाठी द्यावी, अशी आमची भूमिका असून, वाघ यांच्यावर कोणताही वैयक्तिक हेतू नाही.’
- अमोद मुंडे, नागेश सुर्वे - माहिती अधिकार कार्यकर्ता, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.