मुंबई

चार सदस्यीय मतदानामुळे ज्येष्ठांचा गोंधळ

CD

उलवे, ता. १५ (बातमीदार) : निवडणुकीवेळी नेहमीप्रमाणे एकच मत द्यायचे, असे सर्वसामान्य मतदारांचा विचार असतो. पण या वेळी चार वेळा मतदान करण्याची वेळ मतदारांवर आली. प्रभागातील चार जागांसाठी चार वेळा इव्हीएमवर बटण दाबायचे आहे, असे मुख्यतः ज्येष्ठांसह सामान्य नागरिकांनासुद्धा समजून सांगताना अनेक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची कसरत झाली. प्रत्यक्ष मतदान करताना काही समजत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी मतदान करून बाहेर आल्यावर दिली. त्यामुळे नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी मतदान कसे करावे, याची जनजागृती निकामी ठरल्याचे दिसून आले.

चारही जागांसाठी मतदान केल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही, अन्यथा मत बाद ठरेल, हे बऱ्याच लोकांना माहित नव्हते. ही नवीन पद्धत गोंधळाची असल्याचे अनेकांनी सांगितले. बॅलेट पेपरवर जे मतदान होत होते, तेच चांगले होते, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT