मुंबई

आंबेमोरा गाव प्रशासनाच्या उदासीनतेचा बळी

CD

आंबेमोरा गावात पायाभूत सुविधांचा अभाव
नगर परिषदेच्या दुर्लक्षतेमुळे नागरी समस्या गंभीर

तारापुर, ता. १८ (बातमीदार) : डहाणू नगर परिषदेच्या आदिवासीबहुल आंबेमोरा गावातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. यामुळे आंबेमोरा गाव विकासाच्या प्रवाहापासून दूर फेकला गेला असल्याची नाराजी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आंबेमोरा हे आदिवासी गाव अनेक वर्षे मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे. गावातील खड्ड्यांनी भरलेले सिमेंट रस्ते, बंद पडलेले पथदिवे, नादुरुस्त सार्वजनिक बोअरवेल, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा तीव्र अभाव, तसेच घरकुल योजनेपासून वंचित असलेली गरजू कुटुंबे या सर्व समस्या आजही येथे ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. आंबेमोरा गावातील नागरी समस्यांबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच प्रसारमाध्यमांकडून तक्रारी मांडूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. नगर परिषद फक्त कचरा गोळा करण्यापुरती औपचारिकता पार पाडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच गावातील रस्त्याच्या कडेला असलेला सुका कचरा नगर परिषदेचे कर्मचारी गोळा करून तो तसाच रस्त्याच्या कडेला ठेवतात. त्यामुळे तेथे कचऱ्याचे ढीग पडून राहिल्याने गावात रोगराईचा धोका वाढत असल्याचे मतही ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, आदिवासीबहुल आंबेमोरा गावाकडे मात्र कायम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही या वेळी ग्रामस्थांनी केला आहे. दुसरीकडे, नगर परिषद व तालुका प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून, आमच्याकडे अद्याप आंबेमोरा गावातून अशा कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात आली नसल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली.

चौकट

पायाभूत सुविधांचा अभाव
येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री पथदिवे बंद असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने आजारी रुग्णांना आरोग्यसेवांपर्यंत पोहोचणेही कठीण होते. लवकरात लवकर मूलभूत नागरी समस्या सोडवण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------------------
कोट -

आमच्या आंबेमोरा गावातील नगर परिषद व तालुका प्रशासनाकडून नागरी समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, मूलभूत सुविधांसाठी आम्हाला ग्रामस्थांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आंबेमोरा गाव विकासाच्या प्रवाहापासून खूप लांब आहे.

रमेश डोके
आंबेमोरा ग्रामस्थ

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT