मुंबई

कर्ज वसुलीवरून संतापाची लाट

CD

कर्ज वसुलीवरून संतापाची लाट
वाड्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवदेन
वाडा, ता.२० (बातमीदार)ः अतिवृष्टी, अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. अशातच शासनाने एक परिपत्रक काढून कर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. मात्र, वाडा तालुक्याचा त्यामध्ये समावेश नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अतिवृष्टी, अवकाळी पावसाने भात शेतीची अक्षरशः वाट लावली आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतित आहेत.भात शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र शासनाने १० ऑक्टोबर २०२५ रोजी परिपत्रक काढून शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला एक वर्षासाठी स्थगितीचा निर्णय घेतला आहे. पण या परिपत्रकात वाडा तालुक्याचा समावेश नसल्याने अन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT