पूरमुक्त मिरा-भाईंदरसाठी प्रयत्न
जलभराव रोखण्यासाठी समिती, आयुक्तांचा निर्णय
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी जलाभराव होत असतो. या संकटात मोठी वित्तहानी होत असते, शिवाय संपूर्ण यंत्रणाही कोलमडून जात असते. त्यामुळे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी गठित केलेली समिती नवीन उपाययोजना सुचवणार आहे.
मिरा-भाईंदर शहर समुद्रासह खाडीने वेढलेले आहे. शहराच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराचे पाणी शहरातील विविध नाल्यातून खाड्यांमध्ये जाण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने पुरमुक्त मिरा-भाईंदर शहर योजना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एका समितीची स्थापना केली आहे. शहरातील पावसाळ्यात पाणी भरणारी ठिकाणे कोणती, पाणी भरण्याची कारणे काय, भरतीचे पाणी रोखण्यासाठी नवीन नाले बांधणे, नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे अशा प्रकारच्या उपाययोजनांचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
-----------------------------------
समितीचे सदस्य
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत, तर दोन उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य अग्निशमन अधिकारी, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक समितीचे सदस्य, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव आहेत. ही समिती आयुक्तांकडे अहवाल सादर करणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
-------------------------------------
पावसाळ्याला अजून चार ते पाच महिने बाकी आहेत. त्यामुळे समितीच्या माध्यमातून पूरस्थितीवर अभ्यास करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.