२,५०० क्विंटल भाताची खरेदी
विक्रमगडमधील केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादित भातधान्याची शासकीय हमीभावाने खरेदी करत आहे. विक्रमगड येथील धान्य खरेदी केंद्रावर आजपर्यंत विक्रमगड केंद्रावर क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासही सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
यंदाच्या हंगामात भाताला प्रति क्विंटल २,३६९ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून विक्रमगड येथे धान्य खरेदी केंद्र सुरू नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना भातविक्रीसाठी इतर ठिकाणी जावे लागत होते; मात्र यंदा पुन्हा केंद्र सुरू झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. धान्य खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख एस. बी. गवळी व त्यांचे सहकारी पी. व्ही. मौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने धान्य खरेदीचे काम सुरू आहे. त्यामुळे ४७२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून भातविक्रीसाठी सहभाग नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.