मुंबई

आरटीई प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

CD

आरटीई प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील (आरटीई) तरतुदीनुसार ऑनलाइन प्रवेशासाठीची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन मिरा-भाईंदर पालिकेने केले आहे.
दुर्बल व वंचित घटकांतील बालक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. त्याद्वारे स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये या मुलांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येतो. कायद्यातील तरतुदीनुसार याआधी पालकांना परिसराच्या एक किमी अंतरापर्यंतची शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते; परंतु उच्च न्यायालयांच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेल्या निरिक्षणानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्या अनुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट शिथिल करून शाळा दर्शविण्याबाबतची सुविधा संगणक प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळाणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : अश्लील संदेश पाठवायचा; पवईत तरुणीने परप्रांतीयाला दिला चांगलाच चोप

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT