युद्ध थांबू दे, शांतता लाभू दे!
नववर्ष स्वागतानिमित्त वसईकरांची प्रार्थना
वसई, ता. १९ (बातमीदार)ः वसई तालुक्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पारंपरिक वेशभूषा, नववर्षनिमित्त स्वागतयात्रा, ढोल-ताशाचा गजराबरोबर युद्ध थांबू दे, जगात शांतता लाभू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.
वसईच्या साईनगर येथे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक चंद्रशेखर धुरी, शिवसेनेचे जिल्हा सचिव राजाराम बाबर, सुभाष विश्वासराव, जयराम राणे, गोपाळ गावडे, उमेश कामत, संजय कौशल, विलास बिर्जे, प्रशांत कडुलकर, भाजपचे कल्पेश चौहान यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी नगरसेवक चंद्रशेखर धुरी यांच्याहस्ते गुढीपूजन, पंचांगपूजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पश्चिम येथील मानव मंदिर येथे बहुजन विकास आघाडी येथे प्रदीप विचारे, त्यांच्या पत्नी प्रणाली विचारे यांनी पूजन केले.