मुंबई

वांद्री धरणातून पाण्याचा विसर्ग

CD

वांद्री धरणातून पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना
मनोर, ता. २१ ः वांद्री धरणाच्या जॅकवेलमधील पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वांद्री नदीत पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभागाच्या वांद्री धरणाच्या मुख्य विमोचक विहिरीत पडझड झाल्यामुळे पाण्याची गळती सुरू झाली होती. विहिरीतील गळतीमुळे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात होते. त्यामुळे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी विमोचक दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----------------------------
दवंडीतून आवाहन
वांद्री नदीकाठच्या नागरिकांनी नदीत मासेमारी, पोहणे, अंघोळ तसेच कपडे धुण्यासाठी नदीत पात्रात जाऊ नये तसेच वांद्री नदी परीसरात सावधगिरीने वावरण्यासाठी सूचित केले आहे. तसेच ढेकाळे, जानसई, सातीवली, हालोली, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव ग्रामपंचायतींमध्ये दवंडी तसेच समाजमाध्यमातून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT