मुंबई

‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक

CD

‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन माधुरी मिसाळ

मुंबई, ता. २५ : ‘राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे. २७ व २८ मार्च २०२६ला जिओ कन्व्हेशन सेंटर येथे दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्‍घाटन होणार आहे. देश तसेच विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे २,९०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यामध्ये डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा, कौशल्य विकास, संशोधन व नवकल्पना तसेच ग्रामीण व सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण या विषयांवर सखोल चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले, ‘राज्याचा सर्वांगीण विकास आणि विकसित महाराष्ट्र २०४७चे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करणे आवश्यक असून, यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेमुळे आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, औषधनिर्मिती उद्योग, स्टार्टअप आणि वेलनेस पर्यटन या क्षेत्रांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.’ परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून, त्यांच्या सहभागातून नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचारपद्धती आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या वेळी ३० विविध कंपन्या आणि संस्थांसोबत करार करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

एकात्मिक आरोग्य व्यवस्थेवर भर
आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पनांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे. या माध्यमातून राज्याच्या मेडिकल टुरिझम आणि वेलनेस पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ठोस निर्णय, गुंतवणूक करार आणि धोरणात्मक बदल घडवून आणणारे व्यासपीठ ठरेल. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक आधुनिक, परिणामकारक आणि सर्वसमावेशक होऊन ग्रामीण भागातही दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

SCROLL FOR NEXT