मुंबई

ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले

CD

ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले
मोठी आवक झाल्याचा परिणाम
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : उन्हाचा कडाका वाढत असून शरीराला थंडावा देणाऱ्या रसाळ फळांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यानुसार फळांच्या दरात ही वाढ होते. मात्र, यंदा फळांची आवक वाढल्याने बाजारात दर घसरलेले पाहायला मिळत आहेत. पुढच्या महिनाभर तरी हे दर असेच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
उन्हाळ्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई आणि द्राक्षे या फळांना सर्वाधिक पसंती दिली जाते. वाशीच्या घाऊक बाजारात दररोज कलिंगडाच्या ४० ते ४५ गाड्यांची आवक होत आहे. आवक जास्त असल्याने किमती निम्म्यावर आल्या आहेत. घाऊक बाजारातील किंमतीवरील परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी १०० ते १२० रुपयांना मिळणारे कलिंगड आता अवघ्या ५० रुपयांत उपलब्ध होत आहे. द्राक्षांचे दरही किरकोळ बाजारात १५० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत, जे पूर्वी २५० रुपयांच्या घरात होते. दरातील या घसरणीमुळे फळप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या खिशावरील ताण काहीसा कमी झाला आहे. बाजारात आवक कायम राहिल्यास पुढील महिनाभर तरी फळांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

घाऊक बाजारातील दरात फरक (प्रति किलो):
फळ आधीचे दर घाऊक सध्याचे दर घाऊक
कलिंगड २५ ते ३० रुपये १० ते १५ रुपये
टरबूज ३० ते ३५ रुपये १८ ते २५ रुपये
पपई २० ते ३० रुपये १५ ते २० रुपये
द्राक्षे २०० ते २५० रुपये १०० रुपये (सरासरी)

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bhandara News : साकोलीत वाघाचा थरार! उमरझरी शिवारात मिरची तोडणाऱ्या महिलेवर पट्टेदाराचा हल्ला; १० फूट फरफटत नेले, सुदैवाने जीव वाचला

जेवर विमानतळाचे मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन! 'नोएडाला येण्यास आधीचे मुख्यमंत्री घाबरायचे'; अंधश्रद्धेचा पाढा वाचत पंतप्रधानांचा विरोधकांवर प्रहार

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT