रसायनांचा थेट गटारातून विसर्ग
बोईसर, ता. २९ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक रंग लागलेल्या गोण्यांचे सांडपाणी प्रक्रियेशिवाय थेट गटारात सोडले जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. अशात रासायनिक रंग लागलेल्या गोण्यांचे सांडपाणी थेट गटारात सोडले जात असल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. या पाण्यापासून तयार होणारा बर्फ केमिकल कंपन्यांसह काही बार, हॉटेल्सना पुरवला जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाला विचारले असता उत्पादनामध्ये लाल रंगाचा वापर असल्यामुळे प्लॅस्टिक खाली ठेवताना रंग लागतो, असे स्पष्टीकरण सपना डिटर्जंट कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी म्हात्रे यांनी दिले आहे.
--------------------------
कंपनीकडून येणाऱ्या गोण्या पाण्याने स्वच्छ करतो. त्यानंतर गोण्यांमध्ये आईस भरून संबंधित कारखान्यांना पुरवठा केला जातो.
- अरविंद कुमार, व्यवस्थापक (साई आईस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.