मुंबई

धोकादायक इमारतींचे माहेरघर!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : गेल्या काही वर्षांत अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ होत असल्याने धोकादायक इमारतींचे माहेरघर म्हणून नवी ओळख जिल्ह्याची निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सात महापालिका आणि दोन नगर परिषदांमध्ये आठ हजार ३०२ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये ७०२ इमारती या अतिधोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. केवळ भिवंडीमध्ये २८९ अतिधोकादायक इमारती असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या इमारतींमधील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे मोठे आव्हान जिल्हा, तसेच पालिका प्रशासनासमोर असणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला गेल्या काही वर्षांपासून शहरी करण्याचे वेध लागले आहे. पूर्वी शेणाने सारवलेल्या भिंती, कौलारू घरे, अशी काहीशी ग्रामीण भागाची ओळख होती. मात्र, आता ग्रामीण भागातदेखील इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचेदेखील गावपण कमी होऊ लागले आहे. अशातच दुसरीकडे शहरी भागाचा वाढता विस्तार उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. असे असले तरी, शहरी भागासह ग्रामीण भागात अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे जाळे निर्माण झाले आहे. त्यातच सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या माॅन्सूनपूर्व आढावा बैठकीत ठाणे जिल्ह्यात आठ हजार ३०२ इमारती धोकादायक असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली.

‘कुळगाव-बदलापूर’ धोकादायकमुक्त
ठाणे जिल्ह्यातील सात महापालिका व दोन नगर परिषद क्षेत्रात मागील वर्षी ७०० इमारती अतिधोकादायक होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी त्यात दोनने भर पडल्याने संख्या ७०२ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक २८९ इमारती या भिवंडी महापालिका क्षेत्रात आढळून आल्या आहेत. सर्वात कमी म्हणजे अवघी एक अतिधोकादायक इमारत उल्हासनगर पालिका क्षेत्रात आहे, तर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेमध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याची माहिती समोर आली.

नवी मुंबई, मिरा-भाईंदरमध्ये संख्येत घट
एकीकडे ठाणे जिल्ह्यात अतिधोकादायक इमारतींच्या संख्येमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दोनने वाढ झाली, तर दुसरीकडे नवी मुंबई पालिका क्षेत्रात मागील वर्षी ६६ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यात घट होऊन त्याची संख्या ६० वर आली आहे, तर मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रातदेखील मागील वर्षी ४६ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यात घट होऊन त्याची संख्या ३८ वर आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा दोनने वाढ झाल्यामुळे ही संख्या १९२ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींची आकडेवारी
महापालिका क्षेत्र अतिधोकादायक इमारती
ठाणे ९३
नवी मुंबई ६०
मिरा-भाईंदर ४६
कल्याण-डोंबिवली १९२
भिवंडी २८९
उल्हासनगर ०१

अंबरनाथ नगर परिषद २०
कुळगाव-बदलापूर नगर परिषद ००

मुरबाड नगर पंचायत ०९

एकूण ७०२

इमारतींची वर्गवारी
अतिधोकादायक ७०२
धोकादायक १,७६७
मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता ३,८६४
किरकोळ दुरुस्ती आवश्यक १,९८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: आठवड्यात २ दिवस वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि नो व्हेईकल डे... दिल्लीत सरकारचा मोठा निर्णय

शहनाज गिल पडली RCBच्या 'या' क्रिकेटरच्या प्रेमात? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणतात-

"एकदा मोदीसर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर.." पंतप्रधानांच्या आवाहनावर मराठी अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, लातूरची विजयी घोडदौड सुरू, अटीतटीच्‍या लढतीत पुण्याची नाशिकवर मात

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक पीक विमा परतावा

SCROLL FOR NEXT