मुंबई

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७९ वर्षांनी घेरावाडीत उजळला वीजेचा दिवा

CD

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घेरावाडीत उजळला विजेचा दिवा!
कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासीवाडीत प्रथमच वीज
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके (७९ वर्षे) उलटल्यानंतर, पनवेल आणि नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुर्गम आदिवासीवाडीत अखेर विकासाचा प्रकाश पोहोचला आहे. पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या घेरावाडी या दुर्गम आदिवासीवाडीत महावितरणने आव्हानात्मक परिस्थितीत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे गेली अनेक दशके अंधारात जीवन जगणाऱ्या येथील आदिवासी बांधवांच्या आयुष्यात एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
आपटा ग्रामपंचायत हद्दीतील घेरावाडी ही चार ते पाच किलोमीटर जंगलाने वेढलेली दुर्गम वाडी आहे. स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या गावात वीज पोहोचविणे हे मोठे आव्हान होते. मात्र, महावितरणने दुर्गम डोंगराळ परिसरात ३२ उच्चदाब (एचटी) खांब, १६ लघुदाब (एलटी) खांब आणि एक रोहित्र उभारून हे काम यशस्वीपणे पूर्ण केले. शुक्रवारी (ता. १९) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घेरावाडीतील नागरिकांना नवीन वीजजोडण्या प्रदान करण्यात आल्या. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पंचायत समिती अध्यक्षा रंजना वास्कर, कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वीज उपलब्ध झाल्यामुळे आता गावातील विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे सोपे होणार असून मोबाईल चार्जिंग, पंखे, घरगुती उपकरणे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणचे आभार व्यक्त केले आहेत.

आमदारांकडून महावितरणचे कौतुक
महेश बालदी यांनी घारापुरी बेटापर्यंत समुद्रातून वीज पोहोचविण्या प्रमाणेच घेरावाडीसारख्या दुर्गम भागात वीज पोहोचविण्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांचे कौतुक केले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज मिळाल्याने घेरावाडीच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून या आदिवासी वाडीच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT