मुंबई

मायबाप सरकार लक्ष देणार का? तब्बल 25लाख ट्रकचालकांची होतेय उपासमार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्‍यक सेवा पुरवणारे सुमारे 25 लाख ट्रकचालक रस्त्यांवर अडकले आहेत. औषधे व वैद्यकीय साधनसामग्रीची वाहतूक करणाऱ्या या ट्रकचालकांना परतीच्या प्रवासासाठी मनाई करण्यात आल्याने रस्त्यावर एकाच ठिकाणी थांबावे लागले आहे. त्यामुळे या ट्रकचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

बिहारमधील ट्रकचालक दिनेश शहा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात महामार्ग क्र. 8 वर अडकले आहे. ढाबे बंद असल्यामुळे जेवण मिळत नाही; त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी जादा पैसे मोजून काही भांडी विकत घ्यावी लागली. अन्नधान्य, भाजीपाला महागला असून, जीवनावश्‍यक वस्त्‌ूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे फारच बिकट अवस्था झाली आहे, असे त्यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

निर्जंतुकीकरणाची सुविधा हवी 
सध्या जीवनावश्‍यक पुरवठा करणारे ट्रक रस्त्यांवर धावत आहेत. कोरोनाच्या संसर्गाची भीती असतानाही हे ट्रकचालक अत्यावश्‍यक सेवा देत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गांवर वाहनांच्या निर्जंतुकीकरणासाठी व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे ट्रकचालकांची थर्मल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT