मुंबई

आता उद्धव रोखणार मोदींची बुलेट ट्रेन ? 

अभिजीत सोनावणे

राज्यात महाशिवआघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं कंबर कसलीय.  महाशिवआघाडीची सत्ता महाराष्ट्रात आली तर मात्र भाजपच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर पाणी फिरवलं जाऊ शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त क्लीये.   

महाराष्ट्र राज्यात नव्याने राजकीय समिकरणं आखली जातायत. या नव्या सरकारचे प्राधान्यक्रम ठरवले जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मान्य होईल असा एक किमान समान कार्यक्रम ठरवला जातोय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्राधान्यक्रमात शेतकरी, युवा वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या योजनांवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय सध्या अनावश्यक असणाऱ्या आणि खर्चिक अशा योजनांसाठीचा निधी रोखण्याला या नव्या सरकारचं प्राधान्य असेल. त्यामुळे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, आणि नाणार सारखे फडणवीस सरकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.

यापुर्वीही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा वारंवार केलीय. तर शरद पवारांनीही सध्या ओल्या दुष्काळावर लक्ष केंद्रीत केलंय. काँग्रेसनेही आपल्या योजनांमध्ये सर्वसामान्य माणसाला नेहमी प्राधान्य दिलंय. अशा वेळी लोकानुनयी योजनांसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

याशिवाय बुलेट ट्रेन, नाणार आणि समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावर शिवसेनेने प्रकल्प विरोधी भूमिका घेतली होती. ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे महत्वाकांक्षी प्रकल्प थंडबस्त्यात जाण्याची शक्यता आहे.

WebTitle : uddhav thackeray may stop few very important projects started by BJP
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT