मुंबई

मंगळवारपासून उल्हासनगर शहर कडकडीत बंद, आयुक्तांनी दिले OK"हे" आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क

उल्हासनगर) : अंबरनाथ शहरात कोरोनाचा रुग्ण दगावला असून कल्याणला रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. सध्या तरी उल्हासनगरमध्ये एकही रुग्ण नसून त्यानुषंगाने गर्दीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज (ता.7) पासून सायंकाळी 5 नंतर 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत.

तीन तारखेला आयुक्त देशमुख यांनी केवळ भाजीपाला मार्केट्स, हातगाड्या सायंकाळी 5 नंतर बंद ठेवल्या होत्या. 4 तारखेला चिकन-मटण, फळ विक्रेत्यांची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. किराणा दुकाने, दुध डेअरी यांना रात्री 10 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. यावेळी गर्दी दिसल्यास याबाबतही भाजीपाला मार्केट्स प्रमाणे पवित्रा घ्यावा लागणार असा इशारा देखील देशमुख यांनी दिला होता. 

मात्र खरेदीच्या बहाण्याने नागरिक रात्री 10 पर्यंत बाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तडकाफडकी जारी केलेल्या आदेशात उद्यापासून औषध दुकाने वगळता सायंकाळी 5 नंतर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजय एडके, भगवान कुमावत, तुषार सोनवणे यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT