Farmers Help sakal
मुंबई

Farmers Help : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा;राज्यपाल बैस यांना काँग्रेसचे निवेदन

सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यग्र आहे. राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यग्र आहे. राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली.

दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष करत असताना राज्य सरकार मात्र अजगरासारखे सुस्त पडून असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला एकरी ५० हजार रुपये तसेच फळबागांना एकरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व पाण्याची सोय करावी, खते आणि बियाणे सरकारने पुरवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

महापुरुषांचे पुतळे पुनर्स्थापित करा

संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संसद भवन परिसरातील पुतळे केंद्र सरकारने हटविले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. सरकारने तत्काळ हे पुतळे पुनर्स्थापित करावेत, अशी मागणी काँग्रेसने स्वतंत्र निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT