Accident Sakal
मुंबई

Mumbai Accident : नजर हटी दुर्घटना घटी! वांद्रे येथे झालेल्या अपघाताचे कारण समोर

या अपघातात ५ जणांचा झाला होता मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर दसऱ्याच्या दिवशी पहाटे झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. जी क्रेटा गाडी अपघातग्रस्त गाड्यांना जाऊन आदळली होती त्या गाडीचा चालक इरफानने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता आणि हाच मोबाईल अपघाताचे कारण ठरला आहे. दरम्यान या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

(Vandre-Worali C-Link Accident Latest Updates)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचे टायर फुटल्याने अगोदरच या रस्त्यावर एका गाडीचा अपघात झाला होता. या अपघातातली जखमीला नेण्यासाठी आणि गाडी काढण्यासाठी क्रेन आणि अॅम्ब्युलन्स आली होती. त्यानंतर एक गाडी येऊन त्या अपघातग्रस्त गाडीला आणि अॅम्ब्युलन्सला धडकली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

तर दुसऱ्या गाडीतील चालक इरफानने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या फोनची चार्जिंग संपली होती आणि त्याचवेळी तो त्याचा फोन चार्जिंगला लावत असताना त्याचे लक्ष भरकटले आणि अपघात झाला. तर या अपघातात चार्जिंग नसलेला फोन कारणीभूत ठरला आहे.

अपघातात पाच जणांचा मृत्यू

या अपघातात अॅम्ब्युलन्स चालक सोमनाथ साळवे, टोल कर्मचारी सत्येंद्र फौजदाल, राजेंद्र राजपूत, गजराज राजपूत आणि कदम यांचा मृत्यू झाला आहे.

आरोपी उपचार घेऊन घरी गेला

दुसऱ्या गाडीचा चालक इरफान हा या अपघातात जखमी झाला होती तर त्यालाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तो उपचार घेऊन घरी गेल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर गाडीच्या नंबर प्लेटवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अटक केली आहे.

वाहने नेण्यास मनाई असताना वाहने घातल्याने अपघात

वरळी सी लिंकवर थांबण्यास मनाई असतानाही काही गाड्या या ५ ऑक्टोबर रोजी सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या वाहनाने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT