rice 
मुंबई

वसईत शेतकऱ्याने एका एकरातून पिकवला ८00 किलो तांदूळ

प्रसाद जोशी

वसई : पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत वसईत एका शेतकऱ्याने 140 दिवस भातपिकाच्या लागवडीसाठी कालावधी निश्‍चित केल्याने त्यांच्या एक एकर शेतीत तब्बल 1 टन भात तयार झाला असून 800 किलो तांदूळ पिकवला आहे. 

वसई दिवाणमान येथील भूपेश कडुलकर व दिनेश कडुलकर या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर जून महिन्याच्या अखेरीस भातशेतीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी वाडा कोलम जातीचे बियाणे वापरले आहे. यासाठी पेरणी, आवणी, कापणी व अन्य कामांसाठी मजुरांसोबत त्यांनीही काम केले. वसईत बाराशे हेक्‍टरवर भातशेतीची लागवड केली जाते. वसई पूर्वमधील कामण ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गावे तर पश्‍चिम पट्ट्यातील अर्नाळा ते वसई या विस्तीर्ण जागेत असलेल्या जमिनीत भात लागवड होत असते. मात्र, यंदा पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भात कुजले, पेंढ्यापासून मिळणारे उत्पन्न गेले आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र, कडुलकर यांनी शेतातून सुमारे एक हजार किलो भात तयार केला व त्यातून 800 किलो तांदूळ मिळाला आहे; तर पेंढ्याच्या 350 मोळी जमा करण्यात आल्या आहेत. बाजारभावात वाडा कोलम 60 रुपये प्रति किलो असून कडुलकर यांनी 55 रुपयांनी विक्री केला आहे; तर एका पेंढ्याच्या मोळीला त्यांना 40 रुपये इतका भाव मिळाला. मेहनत आणि त्यातून पिकवलेले तांदूळरूपी मोती त्यांच्या कामी आले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे. 

भातलागवडीसाठी कालावधी जास्तीचा घेतला होता. कापणीपर्यंत पाऊस गेला. वातावरण पोषक ठरले, पावसाचा परिणाम झाला नाही. शेतातून समाधानकारक तांदूळ मिळाला असून पेंढ्यापासून देखील उत्पन्नाची साथ लाभली. भातलागवडीनंतर आता जमिनीत विविध भाज्यांची लागवड केली जाणार आहे. 
- भूपेश कडुलकर, दिनेश कडुलकर, शेतकरी, वसई. 

(संपादन : वैभव गाटे)

In Vasai a farmer grows 800 kg of rice from one acre

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT