rice 
मुंबई

वसईत शेतकऱ्याने एका एकरातून पिकवला ८00 किलो तांदूळ

प्रसाद जोशी

वसई : पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत वसईत एका शेतकऱ्याने 140 दिवस भातपिकाच्या लागवडीसाठी कालावधी निश्‍चित केल्याने त्यांच्या एक एकर शेतीत तब्बल 1 टन भात तयार झाला असून 800 किलो तांदूळ पिकवला आहे. 

वसई दिवाणमान येथील भूपेश कडुलकर व दिनेश कडुलकर या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर जून महिन्याच्या अखेरीस भातशेतीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी वाडा कोलम जातीचे बियाणे वापरले आहे. यासाठी पेरणी, आवणी, कापणी व अन्य कामांसाठी मजुरांसोबत त्यांनीही काम केले. वसईत बाराशे हेक्‍टरवर भातशेतीची लागवड केली जाते. वसई पूर्वमधील कामण ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गावे तर पश्‍चिम पट्ट्यातील अर्नाळा ते वसई या विस्तीर्ण जागेत असलेल्या जमिनीत भात लागवड होत असते. मात्र, यंदा पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भात कुजले, पेंढ्यापासून मिळणारे उत्पन्न गेले आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र, कडुलकर यांनी शेतातून सुमारे एक हजार किलो भात तयार केला व त्यातून 800 किलो तांदूळ मिळाला आहे; तर पेंढ्याच्या 350 मोळी जमा करण्यात आल्या आहेत. बाजारभावात वाडा कोलम 60 रुपये प्रति किलो असून कडुलकर यांनी 55 रुपयांनी विक्री केला आहे; तर एका पेंढ्याच्या मोळीला त्यांना 40 रुपये इतका भाव मिळाला. मेहनत आणि त्यातून पिकवलेले तांदूळरूपी मोती त्यांच्या कामी आले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे. 

भातलागवडीसाठी कालावधी जास्तीचा घेतला होता. कापणीपर्यंत पाऊस गेला. वातावरण पोषक ठरले, पावसाचा परिणाम झाला नाही. शेतातून समाधानकारक तांदूळ मिळाला असून पेंढ्यापासून देखील उत्पन्नाची साथ लाभली. भातलागवडीनंतर आता जमिनीत विविध भाज्यांची लागवड केली जाणार आहे. 
- भूपेश कडुलकर, दिनेश कडुलकर, शेतकरी, वसई. 

(संपादन : वैभव गाटे)

In Vasai a farmer grows 800 kg of rice from one acre

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT