Vasai Murder Case After the murder of a girl in Vasai the family has made serious allegations against the police  Esakal
मुंबई

Vasai Murder Case: "पैसे दे अन् मामला रफादफा करू...', वसईतील मुलीच्या हत्येनंतर कुटुंबियांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Vasai Murder Case: पालघर जिल्ह्यातील वसईतील प्रियकरांने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मृत तरूणी आरती यादवच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पालघर जिल्ह्यातील वसईतील प्रियकरांने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरती यादव असं मृत तरूणीचं नाव आहे. तर रोहित यादव असं आरोपीचं नाव आहे. त्याला या घटनेनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर मृत तरूणी आरती यादवच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना तिची आई म्हणाली, "तिच्या जीवाच्या बदल्यात आरोपीचा जीव पाहिजे. त्याचवेळी माझ्या मुलीला न्याय मिळेल, नाहीतर तिला न्याय मिळणार नाही".

तर यावेळी तिच्या कुटुंबातील तिच्या बहिणीने सांगितले की, "रोहितला पोलिसांनी सांगितले पैसे दे हे प्रकरण मिटवतो, ते कोण होते ते देखील मी तुम्हाला दाखवते. आरोपी रोहितला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बहिणीच्या जीवाच्या बदल्यात त्याचा जीव पाहिजे, तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. घटना घडत असताना तिला वाचवायला देखील कोण गेलं नाही, असंही तिने पुढे म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती यादव आणि रोहित यादव यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी रोहित यादव याने वसईतील गावराईपाडा परिसरात आरतीला कामाला लावले होते. महिनाभरापूर्वी आरोपी रोहित यादवला आरती कुठे काम करते यावरून संशय आला. तिथल्या कुणाशी तरी तिचं अफेअर सुरू आहे, असं त्याला वाटतं होतं यावरून गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यामुळे आरतीचे रोहित यादवसोबत ब्रेकअप झाले होते.

या घटनेमुळे आरोपी रोहित चांगलाच चिडला आणि त्याने आरती यादवला मारहाण केली त्यानंतर तिची हत्या केली. रोहित यादव हा हरियाणाचा आहे, तर आरती उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही आधी नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भागात राहत होते, मात्र नंतर आरतीचे कुटुंब दुसरीकडे स्थलांतरित झाले, वसई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

आरती मंगळवारी (18 जून) सकाळी कामासाठी घरून निघाली. त्यानंतर संतापलेल्या रोहितने गौरीपाड्यात तिच्याशी बोलून तिचे कोणासोबत संबंध आहेत, अशी विचारणा केली. ती चालत राहीली यावेळी रोहितने हातातील लोखंडी पाना तिच्या डोक्यात घातला. वारंवार वार केल्यामुळे आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तो काही पावले पुढे गेला आणि मग तो जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी परत आला. तिला जिवंत पाहून त्याने पूर्ण ताकदीने तिच्या मानेवर वार केले आणि आरतीचा मृत्यू होईपर्यंत वार करत राहिला.

यानंतर, तो आरचतीच्या मृतदेहाशेजारी बसला आणि म्हणू लागला, "तू माझ्यासोबत असं का केलंस?" आरतीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एका व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, रोहितने त्याला ढकलून दिले. इतर लोकांनी आणखी थोडे प्रयत्न केले असते तर आरती आज वाचली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT