Baravi Dam Water sakal
मुंबई

Water Crisis : ठाणे जिल्ह्यात पाणी संकट कायम; बारवी धरणात 27 टक्के पाणीसाठा

बारवी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून ठाणे जिल्ह्यातील पाणी कपातीचे संकट गडद होऊ लागले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - जून महिना संपण्यास अवघे 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. पावसास अद्याप सुरवात झाली नाही, तोच बारवी धरणात अवघा 27 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. बारवी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून ठाणे जिल्ह्यातील पाणी कपातीचे संकट गडद होऊ लागले आहे. खालावलेली पाण्याची पातळी पहाता नागरिकांनी पाणी जपून वापरावे अशा सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

2022 च्या तुलनेत यंदा धरणात 5 ते 6 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होत असतानाच यंदा एक वेगळेच संकट घोंगावत आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार एमआयडीसी प्रशासनाने मे महिन्यापासून पंधरा दिवसांतून एकदा पाणी कपात लागू केली होती. बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पाऊस लांबण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पाणी कपातीचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यात ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. यंदाच्या वर्षात सप्टेंबर महिन्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिल्ह्याला अविरत पाणी पुरवठा सुरू होता. मार्च महिन्याचा अखेरीस याच बारवी धरणात 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

बारवी धरणाची क्षमता 338.84 दशलक्ष लीटर इतकी आहे. 30 मार्च रोजी धरणात 170.61 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे धरण एकूण क्षमतेच्या 50.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध होते. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने बारवी धरणातील पाण्याचीं पातळी कमी झाली आहे. दरम्यान जलसाठ्याचं योय नियोजन करण्यासाठी 15 ते 20 टक्क्यांची पाणीकपात केले असेल तरी यंदा जून महिन्यात बारवी धरणात फक्त 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: भारताने मारले रांचीचे मैदान, द. आफ्रिकेला दिली मात; कोहलीच्या शतकानंतर कुलदीप यादव-हर्षित राणा चमकले

Eknath Shinde: ठाण्यातील 'या' शहराला 'टेम्पल सिटी' बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, काय म्हणाले?

Lonavala Car Fire : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर धावत्या मोटारीला अचानक आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

Hinjewadi News : यापुढे अपघात झाला, तर मालकच जबाबदार; ‘आरएमसी’ मालक-चालकांना हिंजवडी पोलिसांची कठोर शब्दांत समज!

IND vs SA, 1st ODI: विराट कोहलीने शतक करताच रोहितने दिली शिवी? गौतम गंभीरची कशी होती रिऍक्शन? पाहा Video

SCROLL FOR NEXT