मुंबई

३० वर्षांत मुंबईसह कोकणाला जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : अमेरिकेतील न्यू जर्सी येथील क्‍लायमेट सेंटर या संस्थेने जगातील सागरी किनाऱ्यावरील अनेक शहरे २०५० पर्यंत बुडतील अशी शक्‍यता व्यक्त केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणासह भारतातील अन्य काही शहरांवरही हे जलसंकट येण्याची शक्‍यता आहे.

हिमनग वितळून समुद्राची पातळी दोन ते सात फुटांनी वाढू शकते. येत्या तीन दशकांत किनारपट्टीवर राहणाऱ्या ३४ कोटी नागरिकांच्या घरांना समुद्राच्या भरतीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.क्‍लायमेट सेंटर संस्थेने ‘नेचर कम्युनिकेशन’ या पत्रिकेत समुद्राच्या पातळीतील वाढ या विषयावरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. कार्बन उत्सर्जनामुळे हिमनग वितळू लागले असून, समुद्राची पातळी वाढत आहे. आता कार्बन उत्सर्जन आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न झाले; तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


किनारपट्टीवर साचणाऱ्या पाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा तिप्पट वाढत असून, येत्या तीन दशकांत जगभरातील ३४ कोटी नागरिकांची घरे समुद्राच्या भरतीखाली जातील. त्यानंतर ५० वर्षांत ६३ कोटी नागरिकांना हा फटका बसेल आणि २० कोटी नागरिकांची घरे असलेला भूभाग समुद्र गिळून टाकेल, असा इशारा देण्यात आला आहे.
‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही महिन्यांपूर्वी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे होणाऱ्या परिणामांबाबत अहवाल सादर केला होता. त्या अहवालात नमूद असलेल्या लोकसंख्येपेक्षा किमान तिप्पट नागरिकांना समुद्राच्या भरतीचा फटका बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आशिया खंडातील देशांत समुद्र किनाऱ्यानजीक राहणाऱ्या नागरिकांना या घडामोडींचा सर्वाधिक फटका बसणार आहे. 

समुद्रातील प्रकल्प
  छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
 वरळी ते नरिमन पॉइंट किनारी मार्ग
 वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू
 नरिमन पॉइंट येथील 
थीम पार्क
 मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील थीम पार्क

 

सावटाखाली...
 भारत : मुंबई, नवी मुंबई, कोलकाता
 व्हिएतनाम : हो ची मिन्ह सिटी
 थायलंड : बॅंकॉक
 चीन : शांघाय


या अहवालामुळे जागतिक तापमानवाढीचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. असे अहवाल येत असतात; मात्र मुंबई ३० वर्षांत बुडणार असती, तर तशी चिन्हे आताच दिसू लागली असती; तसे काहीही दिसत नाही. या अहवालामुळे जागतिक तापमानवाढीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
- अभिजित घोरपडे, पर्यावरण अभ्यासक


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT