Water Scarcity at Vajreshwari Ganeshpuri Akloli in Bhiwandi 
मुंबई

वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली हे तिन्ही पर्यटन व तिर्थक्षेत्राला भीषण पाणी टंचाई

दीपक हिरे

वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा वज्रेश्वरी तिर्थक्षेत्र परिसरात येथील नदी आटल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन ने भातसा तलावामधून पाणी सोडून निदान पिण्यापुरते तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील तहानलेले ग्रामस्थ करीत आहे.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली, या तिर्थक्षेत्र पाण्यासाठी अकलोली येथे तानसा नदी किनारी वज्रेश्वरी पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहे. मात्र यावर्षीचे तापमान, पाणी दुष्काळ व त्यात पाण्याचा येथील रस्त्यांसाठी केलेला उपसा, यामुळे येथील तानसा नदी मे महिन्यात पूर्णतः आटली गेली. नदीमध्ये पाणीच नसल्याने येथील पाणी पुरवठा योजनेची जॅकवेल पूर्ण उघडे पडले आहे. त्यामुळे नदीमध्ये पाणीच नाही तर पुरवठा कसा होईल? परिणामी येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, या ठिकाणी तिन्ही गावच्या ग्रामपंचायत मिळून नवीन मोटार पंप, पाइप आणून नदीतील पाणी असलेल्या एका छोट्या डबक्यात मोटर पाईप टाकून त्यातील हे पाणी जॅकवेलपर्यंत पोहचवले जात आहे व येथून हे पाणी नागरिकला दिले जात आहे. मात्र हे पाणी पिणे योग्य नसल्याने काही नागरिक आजारी पडत आहे. सद्यस्थितीत हे पाणी देखील संपले असल्याने आज तब्बल दहा दिवस झाले आहे. हे तीर्थक्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. 

दरम्यान या भागात काही सामाजिक कार्यकर्ते मिळून पाणी टंचाई दूर करण्यासाठी नदीवर थांबून पाणी डबके शोधत असून प्रयन्त करीत आहे. या भागात पाण्याची भीषण टंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असून महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी येथील हॉटेल, व्यावसायिक, यांचे व्यवसाय बंद पडण्याचा मार्गवर आहेत. या ठिकाणी दोन दिवसात पाऊस न पडल्यास आणखी काही दिवस येथील तिन्ही गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

अशी होऊ शकते पाणी टंचाई दार...
या भागातील तानसा नदीला जोडून अनेक नाले आहेत. त्यामध्ये सैतानी नदी ही तानसा नदीस मिळते. येथील एखादया लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन जलसंपदा विभागाकडे भातसा धरणामधून येथील ग्रामस्थांसाठी पिण्याचे पाणी मागितलेस व ते पाणी काही प्रमाणात सोडले तर येथील सैतानी नदी मार्गातून थेट तानसा नदीमध्ये उतरून येथील पाणी पुरवठा योजनेचा जॅकवेल पाण्याखाली येऊन येथील पाणी टंचाई दूर होऊ शकते. यासाठी लोकप्रतिनिधी व शासन यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नाहीतर येत्या काही दिवसात या तीर्थक्षेत्रामध्ये पाण्यासाठी हाहाकार उडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT