Water Shortage Dombivli give us water or poison demand of people mumbai
Water Shortage Dombivli give us water or poison demand of people mumbai sakal
मुंबई

Water Shortage Dombivli : पाणी द्या नाही तर विष प्यायची परवानगी द्या; नागरिकांचे लेखी निवेदन

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - गावात काही भागात पाणी येते तर काही भागातील नळ कोरडे खणखणीत पडले आहेत. रात्रभर जागून, या त्या नळांवर वणवण करून हंडा भर पाणी देखील पाणी मिळत नसल्याने खोणी वडवली गावातील नागरिक हतबल झाले आहेत. पाणी बिल येते मात्र पाणी मिळत नसल्यामुळे अपाणी द्या नाही तर विष प्राशन करायची परवानगी द्या असे लेखी निवेदन गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.

कल्याण ग्रामीण भागातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र ग्रामपंचायत मधील अंतर्गत राजकीय वादामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी नळांवर भटकंती करावी लागत आहे. गावात जलवाहिन्या आहेत पण त्यातून काही भागाला पाणीच येत नाही. गावात वेगवेगळ्या भागात तीन सत्रात पाणी येते.

वडवली गावातील नळांना पाणीच येत नसल्याने महिला दुसऱ्या भागात जाऊन अपाणी भरण्याचा प्रयत्न करतात. पण तेथील नागरिक त्यांना पाणी भरू देत नाही. रात्रभर वाट पाहुन देखील नळावर पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. पाणी येत नाही पण पाणी बिल नियमितपणे येतात. पाणी बिल नियमित भरतात त्यांना तरी पाणी द्या, मशीन लावून पाणी खेचतात त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी येथील संतप्त ग्रामस्थांनी केली.

पाणी बिल भरून देखील निवडक सदस्यांच्या प्रभागात नियमित पाणी आणि इतरांना वेगळा न्याय हा ग्रामपंचायतीकडून दिला जात आहे. मतदारांना किती वेळा गृहीत धरणार असा प्रश्न ग्राम सदस्यांनी उपस्थित केला आहे.

वारंवार पत्रव्यवहार आणि बैठकांमध्ये पाणी विषय घेऊन सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने विष प्राशन करण्याची परवानगी मागण्याची वेळ आमच्यावर आली आहे. खोणी ग्रामपंचायतीच्या सदस्य जयश्री ठोंबरे आणि मुकुंद ठोंबरे यांनी पत्र लिहून आत्महत्या करण्यास परवानगी मागितली आहे.

सदस्यांचे हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर सध्या ग्रामपंचायत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन सोमवारी काय भूमिका मांडते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

"ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रभागात नागरिकांना पाणी मिळत नाही. आंदोलन करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. तर आता आमची ग्रामपंचायतीकडे एकच मागणी आहे कि तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकत नाही तर विष पिण्याची परवानगी द्या. "

- जयश्री महेश ठोंबरे, सदस्य , खोणी ग्रामपंचायत

"आम्हाला पाण्यासाठी नागरिक दररोज विचारणा करत आहेत. ग्रामपंचातीकडे विषय मांडला तरी ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पाणी नाही देत ग्रामपंचायत किमान आम्हाला विष पिण्याची परवानगी तरी द्यावी. "

- मुकुंद ठोंबरे, सदस्य, खोणी ग्रामपंचाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT