water
water 
मुंबई

गणेशपूरीची पाणीटंचाई मिटणार

दीपक हीरे

वज्रेश्वरी -  दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असलेल्या व महत्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या गणेशपूरीतील पाणीटंचाई मिटणार आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने उसगाव धरणातून गणेशपूरीला पाणी सोडण्याचे मंजूर केले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, पर्यटकांनाही पाणीटंचाईचा फटका बसणार नाही.

गणेशपूरीमध्ये दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असते. गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या घरात आहे. सध्या गावाला अकलोली येथील छोट्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो अपुरा असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात. त्याचबरोबर पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे गणेशपुरीचे सरपंच विनोद पांडूरंग पाटील यांनी खासदार कपिल पाटील यांच्याकडे वाढीव पुरवठ्याची मागणी केली होती.

उसगाव धरणातून गणेशपूरी गावाला पाणी मंजूर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रह धरला होता. गणेशपूरीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याची गरज स्पष्ट केली होती. ही मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर करुन उसगाव धरणातून 0.121 दशलक्ष घनमीटर पाणीकोटा मंजूर केला. या निर्णयामुळे ग्रामस्थांबरोबरच पर्यटकांचीही तहान भागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT