मुंबई

कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन शुक्रवारी (ता. २४) घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा, असे पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi and Emmanuel Macron: भारताचा दबदबा जागतिक पातळीवर कायम! आता मोदींची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा

भक्ती, उत्साह आणि विरहाचा संगम! मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया’

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पावसाच्या सरी असूनही मुंबईत लाखो लोक विसर्जन मिरवणुकीत सामील

Ganesh Festival 2025 : केज पोलिसांची डीजे विरोधात कारवाई; गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा आग्रह

"आठ महिने तिने आम्हाला भेटणं टाळलं" प्रिया मराठेच्या अखेरच्या दिवसांबद्दल मैत्रीण झाली व्यक्त; म्हणाली..

SCROLL FOR NEXT