मुंबई

'ईशान्य भारताच्या सुरक्षेबाबत दक्ष राहण्याची गरज' - ब्रिगेडिअर हेमंत महाजन

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा


मुंबई : ईशान्य भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. तसेच, हा प्रदेश चीन, म्यानमार, नेपाळ, भूतान, बांग्लादेश यांना लागून असल्याने तेथील सुरक्षेबाबत अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे, असे निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी येथे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्यावतीने आयोजित ‘ईशान्य भारतात सुरक्षेची आव्हानं’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलता होते. 

ईशान्य भारतात बोडो, उल्फा, नक्षलवादी, माओवादी तसेच अन्य बंडखोर आणि दहशतवादी संघटनांचा उपद्रव अधिक असला तरी भारतीय जवान त्यांच्यावर कारवाई करत आहेत. त्याची चर्चा प्रसारमाध्यमात होत नसल्यामुळे नागरिकांना त्या कारवाईची माहिती मिळत नाही. या बंडखोर संघटना जवळपास संपत आल्या असून त्याचे श्रेय लष्कराच्या कारवाईला जाते. बंडखोरांना देशातील काही विचारवंत सहकार्य करत असले तर त्यांनादेखील वेळीच रोखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. म्यानमार आणि नेपाळमधून येथे अंमली पदार्थ, बनावट नोटा यांची तस्करी होते. स्मगलिंगच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला मोठा हादरा देण्याचा उद्देश असतो. हेदेखील थेट नसले तरी छुपे युद्ध आहे, त्या आव्हानांनादेखील आपण तोंड दिले पाहिजे, असेही महाजन म्हणाले.

-------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT