मुंबई

आतली खबर : बैठकीनंतर 'हे' आहे शिवसेना आमदारांच्या मनात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  "साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या आमदारांची असून आपली भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली.उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती या बैठकीत आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पुढील भूमिका ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज आपल्या आमदारांची बैठक बोलावली.या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं.यावेळी आमदारांनी "साहेब आता तडजोड करू नका,मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा" अस सांगितलं.भाजप ने शिवसेनेला खूप त्रास दिला.दुय्यम दर्जाची मंत्रीपद शिवसेनेच्या गळ्यात मारली.गेली पाच वर्षे निधीसाठी रखडवलं, आता भाजपला धडा शिकवण्याची हीच ती वेळ अस आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.

आम्हा सर्व आमदारांचा एकच सूर आहे,मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे.भाजपने मान्य न केल्यास 5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल अशी प्रतिक्रिया आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

शिवसेनेत  सगळे वाघाचे बछडे :

शिवसेना का घाबरेल शिवसेनेत तर सगळे वाघाचे बछडे आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली. आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला बच्चू कडू हे देखील उपस्थित राहिले.

Webtitle : what shivsena MLAs think after meeting after uddhav thackeray at matoshree


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

SCROLL FOR NEXT