मुंबई

'वीकेंड लॉकडाउन'ला जोडूनच मोठा लॉकडाउन? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. दररोज मोठ्या प्रमाणावर रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आधी काही निर्बंध लादण्यात आले. त्यानंतर नाइट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनचाही पर्याय वापरण्यात आला. पण अद्याप कोरोना रूग्णांच्या आकड्यात घट होताना दिसत नाही. त्यामुळे शुक्रवारीपासून राज्यातील महत्त्वाच्या नेतेमंडळींच्या बैठका सुरू आहेत. कोरोनाला थांबवायचं असेल तर राज्यात लॉकडाउन लावावाच असेल असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउन लागणार हे जवळपास निश्चित आहे, पण सध्या सुरू असलेल्या वीकेंड लॉकडाउनला जोडूनच मोठा लॉकडाउन लागणार का? या प्रश्नाचं उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.

"कोणत्याही रोगाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा लॉकडाउन लावणं हे महत्त्वाचं असतं. कोरोनाची जर साखळी तोडायची असेल तर राज्यात किमान लॉकडाउन हा १५ दिवसांचा असावा असं माझं मत आहे. त्याची कोरोना साखळी तोडण्यासाठी मदत होईल. पण लॉकडाउनबद्दला किती दिवसांचा असावा? कधीपासून असावा? या गोष्टींचा निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटधील इतर मंत्री मिळून घेतील. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. जनतेलाही मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर अंदाजे १५ दिवसांच्या दरम्यानचा लॉकडाउन लावला जाईल मात्र तो लॉकडाउन वीकेंड लॉकडाउनला जोडून नसेल असं मला वाटतं", असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

"राज्यातील कोणतेही निर्णय लोकांना विश्वासात घेऊनच घेतले जावेत यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. जर लॉकडाउन लावण्याचा निर्णय अंतिम झाला तर राज्यातील जनतेला लॉकडाउनसाठीची तयारी करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा अवधी दिला जाईल असं मला वाटतं. अचानक लॉकडाउन लावल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वीकेंडला जोडूनच लॉकडाउन असणार नाही असं मला वाटतं", अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

लॉकडाउनबद्दल असलम शेख म्हणाले...

"सध्या देशात रोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सर्वत्र कोरोना पसरतोय. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन अटळ आहे. पण ठाकरे सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय अचानक घेतलेला नाही. आधीपासून सगळ्यांना सांगितलं जातंय की गर्दी टाळा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, पण लोक ऐकत नाहीत. त्यामुळे आम्ही नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन, दिवसा जमावबंदी अशा माध्यमातून विविध निर्बंध आणून लोकांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे. आता लोकांना विश्वासात घेऊन, ठराविक वेळ देऊन मग लॉकडाउन लावण्याची शक्यता आहे", अशी भूमिका असलम शेख यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT