मुंबई

...तर त्यांना भर चौकात फटकावलं पाहिजे- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'वीर सावरकरांची जे विटंबना करतात त्यांना भर चौकात फटकावलं पाहिजे, देशासाठी कोणी काय केलंय हे त्यांना ठाऊक नाही, राहुल गांधी ने देखील अश्या प्रकारे सावरकरांचा अपमान केलं होतं अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.दिल्लीत सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्या प्रकरणी ते बोलत होते.

पीक विमा योजनेबद्दल शिवसेनेने मोर्चा काढून कंपन्यांना 15 दिवसाची मुदत कंपन्यांना दिली होती. यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधानांना भेटले आणि यात काय सुधारणा करता येईल हे सांगितले.

शिवसेनेनं प्रत्येक तालुक्यात पीक विमा मदत केंद्र उभारली होती.केंद्र सरकारच्या योजनेत 53 लाख पात्र तर 90 लाख अपात्र शेतकरी ठरवले गेले.यातून 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी मदत शिवसेनेमुळे झाली.2000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं होत ते पैसे कंपन्यांकडे अजून पडून आहेत. अशा प्रकारे हा घोटाळा सुरू आहे. 

शिवसेनेकडे या योजनेबद्दल बद्दल तक्रारी आल्या. शेतकऱ्यांना शिवसेना ही नुकसान भरपाई मिळून देणारच. 90 लाख शेतकऱ्यांना  कोणी अपात्र ठरवलं. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे. सरकारने कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाही तर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. जर कंपनी विमा देत नसेल तर त्यांना शासन झालं पाहिजे.

दुष्काळ आणि पूर सरकारला दिसत आहे पण या कंपन्याना दिसत नाही का? या योजने अंतर्गत ज्या सुधारणा गरजेच्या आहेत त्याबद्दल पंतप्रधानांशी बोलू,तरीही जर कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर या विरोधात शिवसेना आंदोलन करणार असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT