मुंबई

अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण का नाही? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सुनिता महामुनकर

मुंबई : चालू शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण का झाली नाही, याबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. 

अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही. आणखी काही महिन्यांत हे वर्षही संपेल, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. उद्यापर्यंत याबाबत लेखी खुलासा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वकील विशाल सक्‍सेना यांनी केलेल्या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सक्‍सेना यांच्या मुलीने अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे; मात्र अद्यापही प्रक्रिया सुरू झालेले नाही. मराठा आरक्षण मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबल्याने अनिश्‍चित विलंब होत आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. यामुळे मुंबई क्षेत्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी टांगले आहे. 

राज्य सरकार यावर निर्णय घेणार आहे, असे सरकारी वकील गीता शास्त्री यांनी खंडपीठाला सांगितले. प्रवेश प्रक्रिया अपूर्ण असली, तरी ऑनलाईन वर्ग सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला; मात्र याचिकादारांनी या दाव्याचे खंडन केले. राज्य सरकारने तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून अभ्यासक्रम सुरळीत करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. 

Why is the 11th admission process not completed yet Court questions state government 

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT